Monday, July 5, 2010

जीत.........

माझ्याच पावलांना मी आज भीत आहे,
उलटीच या जगाची न्यारीच रीत आहे...

आवाज हा कुणाचा? या कुणाच्या घोषणा?
आक्रोश दाबण्याची, ही त्यांचीच रीत आहे.

फेकला जरी पुढे हा तुकडा मला दयेचा,
चितेवरीच माझ्या यांचे शिजणार शीत आहे.

मुकलो जरी असे मी भेटीस आज माझ्या,
फुत्कार टाकणारे ते माझेच गीत आहे.

गेला बळी कुणाचा? अन संसार ध्वस्त झाले,
खुर्चीवरी परंतु, यांची जडली ती प्रीत आहे...

हरलो जरी असे मी, डाव सारे जीवनाचे,
हरण्यात जीवनाच्या, माझीच जीत आहे....

---------- राजा जोशी

कोण हे ?

रक्तानी त्यांनी शिम्पिल्या जमिनी, अन अंकुर यांचे फुटले,
विसरुनी ते उपकार यांनी लाभलेले सर्वस्व लुटले....

नव्हत्या का त्यांना अपेक्षा समृद्धीस पाहण्याच्या,
पण मीच केले मीच केले, दुराभिमानाचे पेव फुटले....

सर्व त्यांच्या योजनांचा उडविला यांनी बोजवारा....
पाहण्यापूर्वी सर्वनाश हा, बरे त्यांचे डोळे मिटले.....

विस्मृतीत टाकले त्यांना, दाविती हे यांचेच चेहरे,
यांचाच यांनी पिटला डंका, एकूण सारे कान किटले.....

विनवणी आता तुम्हास जन हो, फाडून टाका यांचे बुरखे,
कळू देत जगतास साऱ्या, फुल कुठले अन काटे कुठले.....

कोण हे ?

रक्तानी त्यांनी शिम्पिल्या जमिनी, अन अंकुर यांचे फुटले,
विसरुनी ते उपकार यांनी लाभलेले सर्वस्व लुटले....

नव्हत्या का त्यांना अपेक्षा समृद्धीस पाहण्याच्या,
पण मीच केले मीच केले, दुराभिमानाचे पेव फुटले....

सर्व त्यांच्या योजनांचा उडविला यांनी बोजवारा....
पाहण्यापूर्वी सर्वनाश हा, बरे त्यांचे डोळे मिटले.....

विस्मृतीत टाकले त्यांना, दाविती हे यांचेच चेहरे,
यांचाच यांनी पिटला डंका, एकूण सारे कान किटले.....

विनवणी आता तुम्हास जन हो, फाडून टाका यांचे बुरखे,
कळू देत जगतास साऱ्या, फुल कुठले अन काटे कुठले

का केलंस असं..

एकदा तरी मागे वळून पाहायचं होतंस.....
निदान मी कसा जळत होतो ते पाहायला....
तुझ्या तिरस्कारातील तो विखार जहाल होता...
क्षणार्धात त्यानं मला पेटवलं...
आभाळ फाटून कोसळणाऱ्या पावसात,
एकही ठिणगी न पाडता...
पण ते जळणं वेदनामय होतं...
तू मला धुमसत ठेवलंस...
भडकण्यात मला सुख मिळालं असतं....
मागे काहीच उरलं नसतं...
पण आता उरलं फक्त आयुष्याचा चिखल....
सर्वांनी तुडविण्यासाठी....
आजूबाजूच्या केर-कचऱ्यात...
पालापाचोळयात....
दगड-मातीत मिसळून जाणारा...
माझं अस्तित्वच नाकारणारा....
तुला बहुधा तेच हवं होतं.....
आयुष्यात फक्त प्रेम हवं म्हणून सांगणाऱ्या तुझ्याकडून,
हे किती अनपेक्षित होतं.....

................राजा जोशी

Friday, July 2, 2010

खंत...

आयुष्याच्या वाळवंटात
अश्रूंचा पूर.....
आयुष्य वाहून गेलं तरीही
हृदय मात्र कोरडच...
त्याची तहान वेगळी...
मायेच्या ओलाव्याची....
झेपत नाही त्याला अश्रूंचा लोट..
सगळंच धुवून जातं...
मागे उरत नाही एकही निशाणी...
......खोल खोल घावांची....
आणि ओरखड्यांची.....
मग मागे वळून काय पाहायचं ?
जे आपलं कधीच नव्हतं...
जी नजर परकी होती.....
आभास कि वास्तव....
एव्हढ्या भयानक पुरात वाकुल्या दाखवून हसणारे
ते निःशब्द उसासे.....
काहीच न मिळाल्याने खंतावणारे...
आणि जाळून सुद्धा अस्तित्व दाखवणारे...
उसाच्या सडा सारखे.....