Wednesday, December 8, 2010

आठव..

सोबत आता आपुली, अशी कितीशी राहिली,
आयुष्याच्या मध्यान्ही, तिन्हीसांज जाहली...

ध्यास होता वादळाला कवेत घेण्याचा,
हातास आठवणींची, धूळ थोडी लागली..

आठवतो क्षण तो, जेंव्हा होतो आपण भेटलो,
पावसाने अंतरीची आग सारी जाळली...

भावनाचे पूर सारे, कधीच आटून गेले,
याद आली तुझी, मग पापणी ओलावली...

दूर गेले विश्व सारे, नुरले माझे न काही,
भरदिवसा पायतळी, वाट अन अंधारली...

--राजा जोशी

No comments:

Post a Comment