Monday, April 11, 2011

आपण दोघं...

आपल्या दोघांत आता नातं असं उरलं नाही,
आयुष्यभर जवळ राहून, अंतर कधीच सरलं नाही...
एकाच ध्येयाकडे जाताना मार्ग मात्र समांतर होते,
एकमेकांच्या आयुष्यात कधीच डोकावून पाहिलं नाही....
टेकडीवरच्या मोकळ्या हवेत, आपले श्वास कोंडले होते,
सोसाट्याच्या वाऱ्यात, पण पान देखील हललं नाही...
विस्कटलेल्या आयुष्याचे तुकडे गोळा करता करता,
सगळंच निसटून गेलं, हाती काहीच उरलं नाही....
कोण चुकलं, कोण बरोबर, हिशोब कशाला मांडायचा?
कोणत्याच गणिताचं उत्तर, कधीच बरोबर आलं नाही...
काय विसरायचं, काय आठवायचं? समोर फक्त प्रश्नच आहेत,
अवघं माणूस शोधून पाहिलं, अजून उत्तर सापडलं नाही...

No comments:

Post a Comment