Friday, June 1, 2012

जावू कुठे?

आज मला कुठेतरी दूर जावसं वाटतंय,


जिथं कोणीच असणार नाही, त्या गर्दीत हरवावसं वाटतंय..

डोळे उघडे ठेवून, आंधळ्या सारखं चालायचं...

मेलेल्या भावनांना, रोज हलवून जागवायचं ......

हरवलेल्या चेहऱ्यांना हसून ओळख दाखवायची,

ओढ नसतानाही, पावलं पुढं ओढायची...

फुललेल्या गुलमोहराच, वेगळंच रूप असतं,

मला मात्र आजकाल, आगी सारखं भासतं...

काय होतंय कळत नाही, पण जीव आता रमत नाही,

मुखवटे घालून जगायला, मनसुद्धा धजत नाही....

हे सारं कुठ संपणार? कि याला कधीच अंत नाही?

मेलेल्या भावनावर जगताना, कुणालाच इथे खंत नाही.....

No comments:

Post a Comment