Friday, December 13, 2013

विरह…

असेल आठव तुजला, मी न विसरलो काही,
वादळात हरवली पाने वाऱ्यास बोललो नाही….

साक्षीस एक केवळ ते झाड पिंपळाचे,
पानात फक्त सळसळ, दोघेही बोललो नाही…

दोघात बंध होते, तुटले कसे अचानक,
मेघात गुंतली किरणे पण सूर्यास बोललो नाही……

भासे गतक्षणांची ओळख अजून ताजी,
अंधार सावलीचा पण दिव्यास बोललो नाही….

एकला आता असा मी, आयुष्य ओढतो हे,
शपथ परस्परांच्या, अजून विसरलो नाही…

No comments:

Post a Comment