मी मला पाहिल्याचं मला फारस आठवत नाही,
तसा मी इतरांच्याही आयुष्यात डोकावत नाही....
आपल्या आजूबाजूला खूप काही घडत असतं,
कुणाचं आयुष्य सरळ असतं, कुणी सारखं पडत असतं....
फांद्या नसलेला माड नारळांनी भरलेला असतो,
हवेच्या थोड्या बदलान, आंब्याचा मोहोर गळून पडतो....
वाकडी तिकडी वाट सुद्धा घराकडे सरळ नेते,
सुखाच्या मार्गाला पण कधी कधी मरगळ येते...
उभे खडे कडे, लंगडे सहज चढून जातात,
केवळ एका स्पर्शानेही मुके सारे बोलून जातात...
चाकोरीतच चालायचं,असा काही ठरलेलं नसतं,
भरलेल्या ताटात सुद्धा, खायला काही उरलेलं नसतं...
परिस्थितीला समोर जाण, हाच एक मार्ग असतो,
विषातही अमृत पाहिलंत,तर इथेच सारा स्वर्ग असतो...
.
chan sundar kavita ahet...
ReplyDeletemala Khup Khup Awadli
ReplyDeleteAgdi Manatal Kahi ..........
ReplyDelete