Sunday, June 19, 2011

प्रश्न...

केलेत बंद त्यांनी खिडक्या गवाक्ष दारे,
बाहेर मुक्त वारा, त्यांना उगा पुकारे...

धारा सहस्त्र ओल्या अंगावरून गेल्या,
कोरड्या मनात माझ्या फुलतात का निखारे.....

पाऊस माणसांचा तो कोसळे निरंत,
कोणीच आत नाही, कि गेले लयास सारे?

मी आज प्रश्न माझे, शोधिले उत्तरात,
काहीच आकळेना, झालेत शब्द कोरे....

No comments:

Post a Comment