सूर्याच्या किरणानाही अंधाराची ओढ असते,
छोट्याश्या झरोक्यातून, ते घरामध्ये लपून बसते.....
इवल्या इवल्या वेली सुद्धा वृक्षाचा आधार होतात,
प्रत्येकाला कुठल्यातरी सहाऱ्याची गरज असते....
अवखळ ओढे नदीला भेटले कि शांत होतात,
दोघामध्ये जणू आई-मुलाचे नाते असते....
आयुष्याच्या प्रवासात, कित्येक मित्र येवून जातात,
त्यांनी जपलेली आठवण, हीच आपली ओळख असते....
No comments:
Post a Comment