Friday, June 18, 2010

निरोप......

डोळ्यात आज अश्रूंना सजविले पाहिजे,
दिवे सारे निमाले, मज स्वतःच जळले पाहिजे.

समजू नको मला कि विरहात सुख आहे,
जगता समोर मजला, पण हसलेच पाहिजे.

पुन्हा एक रिती कोरडी सांज गेली,
मनास आता मला, समाजावालेच पाहिजे.

रक्ताने लिहीन, नाव तुझे नाव माझ्या कबरी वरी,
कबरीस त्या फुलांनी तू सजविले पाहिजे.

युगामागुनी युगे तुझ्या प्रतीक्षेत गेली,
संपले आयुष्य आता, मज परतले पाहिजे.....

------- राजा जोशी

No comments:

Post a Comment