Thursday, February 17, 2011

कधी कधी असं होतं.......

कधी कधी असं होतं, काहीच कळत नाही,
वणव्यात उडी मारून देखील, शल्य काही जळत नाही.....

बेधुंद पावसाच्या सारी अंगावर धावून येतात,
भावनांना पूर येतो, मात्र मन काही भरत नाही.... .

दूरच्या जळणाऱ्या दिव्यांनी, रात्रीची जाणीव होते,
तुझ्या भेटीची सांज मात्र, मनातून सरत नाही...

कित्येकदा वाटते, त्या अंधारात झोकून द्यावे,
तुझा आठव आलाकी मात्र, पाय तिकडे वळत नाही...

का अशा बंधनात, तू मला अडकून ठेवलेस?
समोरच मृत्यू दिसतोय, पण जगणे मात्र संपत नाही....

No comments:

Post a Comment