Friday, February 18, 2011

कारण शेवटी बाकी शून्य उरते....

कधीतरी आयुष्यात असं काही घडतं
सावरायालाही वेळ मिळत नाही,
प्रलयाची लाट रोंरावत येते,
आयुष्यभर जपलेलं, काहीच उरत नाही.....

कुणीतरी आपला जीवाचं माणूस असतं
दुसरंच कोणी तरी त्याला ओढू पाहत,
काळजाच्या कप्प्यात जीवापाड जपलेलं
बळेच त्याला बाहेर काढू पाहत....

ती काळजाची वीण तुटताना
जीवाला ज्या यातना होतात,
तोडणाऱ्याला काहींच देणं घेणं नसतं,
त्या दोन जीवांचे मात्र हाल होतात....

सगळं कसं निमुटपणे सोसायचं
आपल्याला कोणताच आधार नसतो,
आपली तशी वृत्तीच नसते
आपल्याकडे भावनेचा व्यापार नसतो...

आयुष्याच्या जमापुंजीतून सारखी
अशी वजाबाकी होतंच राहते,
मात्र हिशोब कधीच मांडायचा नाही
कारण शेवटी बाकी शून्य उरते....

1 comment: