जाणले होते मी, हे असेच होणार आहे,
मृत्युनंतरही मी एकटा असणार आहे...
विस्कटले हृदय, मी एकला आक्रन्द्लो,
कोणास माझ्या वेदनेची, जाणीव ती असणार आहे?
दुःख ते वाहून गेले, जखमा ओल्याच राहिल्या,
तिरस्काराने तुझ्या मी घाव ते भरणार आहे..
भासले कोणीतरी, चाहूल मजला लागली,
वेळ पण निघून गेली, मी आता नसणार आहे...
Tuesday, February 15, 2011
तिमिरात चांदण्यांची.....
तिमिरात चांदण्यांची ओंजळ नभी सांडली,
प्रिया आज थोडी भेट आहे लांबली.
मौनातले तुझ्या मी अर्थ सारे जाणले,
हृदयातील तव मी हाक आहे ऐकिली.
वाटे तुझ्यामध्ये मी असे एकरूप व्हावे,
देह दोन तरी, एक व्हावी सावली.
माझ्याच या सुखाचा मज वाटतो रे हेवा,
मैफिल जीवनाची तालासुरात रंगली.
प्रिया आज थोडी भेट आहे लांबली.
मौनातले तुझ्या मी अर्थ सारे जाणले,
हृदयातील तव मी हाक आहे ऐकिली.
वाटे तुझ्यामध्ये मी असे एकरूप व्हावे,
देह दोन तरी, एक व्हावी सावली.
माझ्याच या सुखाचा मज वाटतो रे हेवा,
मैफिल जीवनाची तालासुरात रंगली.
Wednesday, December 8, 2010
आर्जव....
ते धुंद स्वप्न प्रीतीचे माझे तू उजळून जा,
या धुंद माझ्या प्रीतीत सदाही तू हरवून जा...
भावनांची धुंद माझ्या हो फुले तुझ्या गाली,
प्रीतीच्या गजरयात ही, फुले तू माळून जा..
बासरी मी, धून तू मधुर त्या बासरीची,
प्रीतीला या बासरीची मधुरता सांगून जा....
वसंत माझ्या प्रीतीचा फुलारला जीवनी,
वसंती या पुष्पासम सदाही तू बहरून जा...
--राजा जोशी
या धुंद माझ्या प्रीतीत सदाही तू हरवून जा...
भावनांची धुंद माझ्या हो फुले तुझ्या गाली,
प्रीतीच्या गजरयात ही, फुले तू माळून जा..
बासरी मी, धून तू मधुर त्या बासरीची,
प्रीतीला या बासरीची मधुरता सांगून जा....
वसंत माझ्या प्रीतीचा फुलारला जीवनी,
वसंती या पुष्पासम सदाही तू बहरून जा...
--राजा जोशी
आठव..
सोबत आता आपुली, अशी कितीशी राहिली,
आयुष्याच्या मध्यान्ही, तिन्हीसांज जाहली...
ध्यास होता वादळाला कवेत घेण्याचा,
हातास आठवणींची, धूळ थोडी लागली..
आठवतो क्षण तो, जेंव्हा होतो आपण भेटलो,
पावसाने अंतरीची आग सारी जाळली...
भावनाचे पूर सारे, कधीच आटून गेले,
याद आली तुझी, मग पापणी ओलावली...
दूर गेले विश्व सारे, नुरले माझे न काही,
भरदिवसा पायतळी, वाट अन अंधारली...
--राजा जोशी
आयुष्याच्या मध्यान्ही, तिन्हीसांज जाहली...
ध्यास होता वादळाला कवेत घेण्याचा,
हातास आठवणींची, धूळ थोडी लागली..
आठवतो क्षण तो, जेंव्हा होतो आपण भेटलो,
पावसाने अंतरीची आग सारी जाळली...
भावनाचे पूर सारे, कधीच आटून गेले,
याद आली तुझी, मग पापणी ओलावली...
दूर गेले विश्व सारे, नुरले माझे न काही,
भरदिवसा पायतळी, वाट अन अंधारली...
--राजा जोशी
Tuesday, December 7, 2010
हार माझी ....
हार माझी ....
काय मी सांगू तुलारे, शब्द सारे संपले,
पोचवू भावना कश्या? भाव सारे आटले...
चांदण्या रात्रीतली मी धुंदी कधी न पाहिली,
अन स्पर्श निशावायुचे मज कधी न लाभले...
वाट सारी संपून गेली, पाय आता थांबले,
दूर क्षितीजावरी ते चंद्रबिंबहि लोपले...
मी करंटी आज, भार झाला माझा मला,
त्या दिव्यांनी का जळावे? प्राण जरी मी ओतले....
तू राहा तेथे सुखाने, आहेस जेथे राजसा,
विरहाने तुझ्या मग, हृदय जरी हे पेटले.....
--- राजा जोशी
काय मी सांगू तुलारे, शब्द सारे संपले,
पोचवू भावना कश्या? भाव सारे आटले...
चांदण्या रात्रीतली मी धुंदी कधी न पाहिली,
अन स्पर्श निशावायुचे मज कधी न लाभले...
वाट सारी संपून गेली, पाय आता थांबले,
दूर क्षितीजावरी ते चंद्रबिंबहि लोपले...
मी करंटी आज, भार झाला माझा मला,
त्या दिव्यांनी का जळावे? प्राण जरी मी ओतले....
तू राहा तेथे सुखाने, आहेस जेथे राजसा,
विरहाने तुझ्या मग, हृदय जरी हे पेटले.....
--- राजा जोशी
Tuesday, November 23, 2010
परत.....
पाण्यात पाहताना प्रतिबिंब आपुले ते,
माझ्याच दो करांनी, हळुवार झाकले ते...
हृदयात भावनांचा कल्लोळ आज झाला,
जे काल प्रेम होते, आताच आटले ते...
मेघात काल होती निःशब्द शांतता ती,
गरजे आता असा कि, आभाळ फाटले ते..
वाटेवरी सुखाच्या सारी फुले उधळली,
जळतात पाय तेथे, अंगार भासले ते...
येथून दुःख होते मीच माझे टाकले,
हळुवार पावलांनी, येथेच भेटले ते...
माझ्याच दो करांनी, हळुवार झाकले ते...
हृदयात भावनांचा कल्लोळ आज झाला,
जे काल प्रेम होते, आताच आटले ते...
मेघात काल होती निःशब्द शांतता ती,
गरजे आता असा कि, आभाळ फाटले ते..
वाटेवरी सुखाच्या सारी फुले उधळली,
जळतात पाय तेथे, अंगार भासले ते...
येथून दुःख होते मीच माझे टाकले,
हळुवार पावलांनी, येथेच भेटले ते...
Wednesday, November 17, 2010
आई-बाबा सांगाना, तुम्ही असं का केलंत?
आई-बाबा सांगाना, तुम्ही असं का केलंत?
जगाच्या पसाऱ्यात, आम्हाला एकट सोडून दिलंत..
आम्ही असं काय केलं? म्हणून आम्हाला ही शिक्षा दिली?
आम्हावर केलेल्या प्रेमाची अशी परीक्षा का घेतली?
स्वप्नांचे मनोरे रचायला अजून सुरुवातही केली नाही,
आणि जगात उभं राहण्याची तयारीही झाली नाही..
छोटू किती लहान आहे, अजून चालूही शकत नाही,
आणि आयुष्य पेलण्याची, अजून माझ्यात ताकद नाही..
आमच्या साठी तुम्ही दोघ, सारं काही करत होता,
फक्त आमच्या सुखासाठी, रात्रंदिवस राबत होता...
तुम्हाला चिंता असावी आपल्या बाळांच कसं होईल,
पण दयेवर जगताना आता, आमची अवस्था काय होईल?
समजत होतं आम्हाला, आपल्याकडे फार काही नव्हतं,
पण आम्हालाही तुमच्या शिवाय, दुसरं काही नको होतं...
सगळेच आई-बाबा असं करतात? मला तसं वाटत नाही,
तुम्हीच असं का केलंत, मला अजून समजत नाही..
सांगाना बाबा? आता आम्ही काय करायचं?
कोणत्या आधारावर जगायचं? कि तुमच्याकडेच यायचं?
या घराला आता फक्त पडक्या भिंती उरल्या आहेत,
कोसळलेल्या छपराखाली, साऱ्या आकांक्षा पुरल्या आहेत....
उजळणार्या पूर्वेला माझी सतत नजर होती,
आणि याचवेळी, आम्हाला तुमची खूप गरज होती...
फार काही भव्य स्वप्ने मी पाहत नव्हतो,
तुम्हाला अभिमान वाटेल, अशाच गोशी करत होतो...
तुम्हीतर निघून गेलात, परत काही येणार नाही,
पण छोटुला कसं समजावू? त्याला हे पटणार नाही...
व्हायचं ते होऊन गेलं, आता रडून उपयोग नाही,
हेच खरं कि तुमच्या आधाराचा, माझ्या नशिबात योग नाही....
आता मला दुख्खाला आवर घालायलाच हवा...
अन्कुरणाऱ्या त्या कोम्बाला, भक्कम आधार द्यायला हवा..
झाड आणि वेली सारखे, एकमेकांना आधार देवू,
आयुष्याच्या नौकेला, या वादळातूनहि पार नेवू..
तुमचे आशीर्वाद असल्यावर पायात हत्तीचे बळ येईल,
तुम्ही लावलेल्या रोपांना, निर्मळ यशाचे फळ येईल...
आई, बाबा, तुमचे संस्कार वाया जावू देणार नाही,
संकटाना भिवून, कधीच माघार घेणार नाही...
कधीच माघार घेणार नाही.....
जगाच्या पसाऱ्यात, आम्हाला एकट सोडून दिलंत..
आम्ही असं काय केलं? म्हणून आम्हाला ही शिक्षा दिली?
आम्हावर केलेल्या प्रेमाची अशी परीक्षा का घेतली?
स्वप्नांचे मनोरे रचायला अजून सुरुवातही केली नाही,
आणि जगात उभं राहण्याची तयारीही झाली नाही..
छोटू किती लहान आहे, अजून चालूही शकत नाही,
आणि आयुष्य पेलण्याची, अजून माझ्यात ताकद नाही..
आमच्या साठी तुम्ही दोघ, सारं काही करत होता,
फक्त आमच्या सुखासाठी, रात्रंदिवस राबत होता...
तुम्हाला चिंता असावी आपल्या बाळांच कसं होईल,
पण दयेवर जगताना आता, आमची अवस्था काय होईल?
समजत होतं आम्हाला, आपल्याकडे फार काही नव्हतं,
पण आम्हालाही तुमच्या शिवाय, दुसरं काही नको होतं...
सगळेच आई-बाबा असं करतात? मला तसं वाटत नाही,
तुम्हीच असं का केलंत, मला अजून समजत नाही..
सांगाना बाबा? आता आम्ही काय करायचं?
कोणत्या आधारावर जगायचं? कि तुमच्याकडेच यायचं?
या घराला आता फक्त पडक्या भिंती उरल्या आहेत,
कोसळलेल्या छपराखाली, साऱ्या आकांक्षा पुरल्या आहेत....
उजळणार्या पूर्वेला माझी सतत नजर होती,
आणि याचवेळी, आम्हाला तुमची खूप गरज होती...
फार काही भव्य स्वप्ने मी पाहत नव्हतो,
तुम्हाला अभिमान वाटेल, अशाच गोशी करत होतो...
तुम्हीतर निघून गेलात, परत काही येणार नाही,
पण छोटुला कसं समजावू? त्याला हे पटणार नाही...
व्हायचं ते होऊन गेलं, आता रडून उपयोग नाही,
हेच खरं कि तुमच्या आधाराचा, माझ्या नशिबात योग नाही....
आता मला दुख्खाला आवर घालायलाच हवा...
अन्कुरणाऱ्या त्या कोम्बाला, भक्कम आधार द्यायला हवा..
झाड आणि वेली सारखे, एकमेकांना आधार देवू,
आयुष्याच्या नौकेला, या वादळातूनहि पार नेवू..
तुमचे आशीर्वाद असल्यावर पायात हत्तीचे बळ येईल,
तुम्ही लावलेल्या रोपांना, निर्मळ यशाचे फळ येईल...
आई, बाबा, तुमचे संस्कार वाया जावू देणार नाही,
संकटाना भिवून, कधीच माघार घेणार नाही...
कधीच माघार घेणार नाही.....
Subscribe to:
Posts (Atom)