पाण्यात पाहताना प्रतिबिंब आपुले ते,
माझ्याच दो करांनी, हळुवार झाकले ते...
हृदयात भावनांचा कल्लोळ आज झाला,
जे काल प्रेम होते, आताच आटले ते...
मेघात काल होती निःशब्द शांतता ती,
गरजे आता असा कि, आभाळ फाटले ते..
वाटेवरी सुखाच्या सारी फुले उधळली,
जळतात पाय तेथे, अंगार भासले ते...
येथून दुःख होते मीच माझे टाकले,
हळुवार पावलांनी, येथेच भेटले ते...
Tuesday, November 23, 2010
Wednesday, November 17, 2010
आई-बाबा सांगाना, तुम्ही असं का केलंत?
आई-बाबा सांगाना, तुम्ही असं का केलंत?
जगाच्या पसाऱ्यात, आम्हाला एकट सोडून दिलंत..
आम्ही असं काय केलं? म्हणून आम्हाला ही शिक्षा दिली?
आम्हावर केलेल्या प्रेमाची अशी परीक्षा का घेतली?
स्वप्नांचे मनोरे रचायला अजून सुरुवातही केली नाही,
आणि जगात उभं राहण्याची तयारीही झाली नाही..
छोटू किती लहान आहे, अजून चालूही शकत नाही,
आणि आयुष्य पेलण्याची, अजून माझ्यात ताकद नाही..
आमच्या साठी तुम्ही दोघ, सारं काही करत होता,
फक्त आमच्या सुखासाठी, रात्रंदिवस राबत होता...
तुम्हाला चिंता असावी आपल्या बाळांच कसं होईल,
पण दयेवर जगताना आता, आमची अवस्था काय होईल?
समजत होतं आम्हाला, आपल्याकडे फार काही नव्हतं,
पण आम्हालाही तुमच्या शिवाय, दुसरं काही नको होतं...
सगळेच आई-बाबा असं करतात? मला तसं वाटत नाही,
तुम्हीच असं का केलंत, मला अजून समजत नाही..
सांगाना बाबा? आता आम्ही काय करायचं?
कोणत्या आधारावर जगायचं? कि तुमच्याकडेच यायचं?
या घराला आता फक्त पडक्या भिंती उरल्या आहेत,
कोसळलेल्या छपराखाली, साऱ्या आकांक्षा पुरल्या आहेत....
उजळणार्या पूर्वेला माझी सतत नजर होती,
आणि याचवेळी, आम्हाला तुमची खूप गरज होती...
फार काही भव्य स्वप्ने मी पाहत नव्हतो,
तुम्हाला अभिमान वाटेल, अशाच गोशी करत होतो...
तुम्हीतर निघून गेलात, परत काही येणार नाही,
पण छोटुला कसं समजावू? त्याला हे पटणार नाही...
व्हायचं ते होऊन गेलं, आता रडून उपयोग नाही,
हेच खरं कि तुमच्या आधाराचा, माझ्या नशिबात योग नाही....
आता मला दुख्खाला आवर घालायलाच हवा...
अन्कुरणाऱ्या त्या कोम्बाला, भक्कम आधार द्यायला हवा..
झाड आणि वेली सारखे, एकमेकांना आधार देवू,
आयुष्याच्या नौकेला, या वादळातूनहि पार नेवू..
तुमचे आशीर्वाद असल्यावर पायात हत्तीचे बळ येईल,
तुम्ही लावलेल्या रोपांना, निर्मळ यशाचे फळ येईल...
आई, बाबा, तुमचे संस्कार वाया जावू देणार नाही,
संकटाना भिवून, कधीच माघार घेणार नाही...
कधीच माघार घेणार नाही.....
जगाच्या पसाऱ्यात, आम्हाला एकट सोडून दिलंत..
आम्ही असं काय केलं? म्हणून आम्हाला ही शिक्षा दिली?
आम्हावर केलेल्या प्रेमाची अशी परीक्षा का घेतली?
स्वप्नांचे मनोरे रचायला अजून सुरुवातही केली नाही,
आणि जगात उभं राहण्याची तयारीही झाली नाही..
छोटू किती लहान आहे, अजून चालूही शकत नाही,
आणि आयुष्य पेलण्याची, अजून माझ्यात ताकद नाही..
आमच्या साठी तुम्ही दोघ, सारं काही करत होता,
फक्त आमच्या सुखासाठी, रात्रंदिवस राबत होता...
तुम्हाला चिंता असावी आपल्या बाळांच कसं होईल,
पण दयेवर जगताना आता, आमची अवस्था काय होईल?
समजत होतं आम्हाला, आपल्याकडे फार काही नव्हतं,
पण आम्हालाही तुमच्या शिवाय, दुसरं काही नको होतं...
सगळेच आई-बाबा असं करतात? मला तसं वाटत नाही,
तुम्हीच असं का केलंत, मला अजून समजत नाही..
सांगाना बाबा? आता आम्ही काय करायचं?
कोणत्या आधारावर जगायचं? कि तुमच्याकडेच यायचं?
या घराला आता फक्त पडक्या भिंती उरल्या आहेत,
कोसळलेल्या छपराखाली, साऱ्या आकांक्षा पुरल्या आहेत....
उजळणार्या पूर्वेला माझी सतत नजर होती,
आणि याचवेळी, आम्हाला तुमची खूप गरज होती...
फार काही भव्य स्वप्ने मी पाहत नव्हतो,
तुम्हाला अभिमान वाटेल, अशाच गोशी करत होतो...
तुम्हीतर निघून गेलात, परत काही येणार नाही,
पण छोटुला कसं समजावू? त्याला हे पटणार नाही...
व्हायचं ते होऊन गेलं, आता रडून उपयोग नाही,
हेच खरं कि तुमच्या आधाराचा, माझ्या नशिबात योग नाही....
आता मला दुख्खाला आवर घालायलाच हवा...
अन्कुरणाऱ्या त्या कोम्बाला, भक्कम आधार द्यायला हवा..
झाड आणि वेली सारखे, एकमेकांना आधार देवू,
आयुष्याच्या नौकेला, या वादळातूनहि पार नेवू..
तुमचे आशीर्वाद असल्यावर पायात हत्तीचे बळ येईल,
तुम्ही लावलेल्या रोपांना, निर्मळ यशाचे फळ येईल...
आई, बाबा, तुमचे संस्कार वाया जावू देणार नाही,
संकटाना भिवून, कधीच माघार घेणार नाही...
कधीच माघार घेणार नाही.....
Monday, July 5, 2010
जीत.........
माझ्याच पावलांना मी आज भीत आहे,
उलटीच या जगाची न्यारीच रीत आहे...
आवाज हा कुणाचा? या कुणाच्या घोषणा?
आक्रोश दाबण्याची, ही त्यांचीच रीत आहे.
फेकला जरी पुढे हा तुकडा मला दयेचा,
चितेवरीच माझ्या यांचे शिजणार शीत आहे.
मुकलो जरी असे मी भेटीस आज माझ्या,
फुत्कार टाकणारे ते माझेच गीत आहे.
गेला बळी कुणाचा? अन संसार ध्वस्त झाले,
खुर्चीवरी परंतु, यांची जडली ती प्रीत आहे...
हरलो जरी असे मी, डाव सारे जीवनाचे,
हरण्यात जीवनाच्या, माझीच जीत आहे....
---------- राजा जोशी
उलटीच या जगाची न्यारीच रीत आहे...
आवाज हा कुणाचा? या कुणाच्या घोषणा?
आक्रोश दाबण्याची, ही त्यांचीच रीत आहे.
फेकला जरी पुढे हा तुकडा मला दयेचा,
चितेवरीच माझ्या यांचे शिजणार शीत आहे.
मुकलो जरी असे मी भेटीस आज माझ्या,
फुत्कार टाकणारे ते माझेच गीत आहे.
गेला बळी कुणाचा? अन संसार ध्वस्त झाले,
खुर्चीवरी परंतु, यांची जडली ती प्रीत आहे...
हरलो जरी असे मी, डाव सारे जीवनाचे,
हरण्यात जीवनाच्या, माझीच जीत आहे....
---------- राजा जोशी
कोण हे ?
रक्तानी त्यांनी शिम्पिल्या जमिनी, अन अंकुर यांचे फुटले,
विसरुनी ते उपकार यांनी लाभलेले सर्वस्व लुटले....
नव्हत्या का त्यांना अपेक्षा समृद्धीस पाहण्याच्या,
पण मीच केले मीच केले, दुराभिमानाचे पेव फुटले....
सर्व त्यांच्या योजनांचा उडविला यांनी बोजवारा....
पाहण्यापूर्वी सर्वनाश हा, बरे त्यांचे डोळे मिटले.....
विस्मृतीत टाकले त्यांना, दाविती हे यांचेच चेहरे,
यांचाच यांनी पिटला डंका, एकूण सारे कान किटले.....
विनवणी आता तुम्हास जन हो, फाडून टाका यांचे बुरखे,
कळू देत जगतास साऱ्या, फुल कुठले अन काटे कुठले.....
विसरुनी ते उपकार यांनी लाभलेले सर्वस्व लुटले....
नव्हत्या का त्यांना अपेक्षा समृद्धीस पाहण्याच्या,
पण मीच केले मीच केले, दुराभिमानाचे पेव फुटले....
सर्व त्यांच्या योजनांचा उडविला यांनी बोजवारा....
पाहण्यापूर्वी सर्वनाश हा, बरे त्यांचे डोळे मिटले.....
विस्मृतीत टाकले त्यांना, दाविती हे यांचेच चेहरे,
यांचाच यांनी पिटला डंका, एकूण सारे कान किटले.....
विनवणी आता तुम्हास जन हो, फाडून टाका यांचे बुरखे,
कळू देत जगतास साऱ्या, फुल कुठले अन काटे कुठले.....
कोण हे ?
रक्तानी त्यांनी शिम्पिल्या जमिनी, अन अंकुर यांचे फुटले,
विसरुनी ते उपकार यांनी लाभलेले सर्वस्व लुटले....
नव्हत्या का त्यांना अपेक्षा समृद्धीस पाहण्याच्या,
पण मीच केले मीच केले, दुराभिमानाचे पेव फुटले....
सर्व त्यांच्या योजनांचा उडविला यांनी बोजवारा....
पाहण्यापूर्वी सर्वनाश हा, बरे त्यांचे डोळे मिटले.....
विस्मृतीत टाकले त्यांना, दाविती हे यांचेच चेहरे,
यांचाच यांनी पिटला डंका, एकूण सारे कान किटले.....
विनवणी आता तुम्हास जन हो, फाडून टाका यांचे बुरखे,
कळू देत जगतास साऱ्या, फुल कुठले अन काटे कुठले
विसरुनी ते उपकार यांनी लाभलेले सर्वस्व लुटले....
नव्हत्या का त्यांना अपेक्षा समृद्धीस पाहण्याच्या,
पण मीच केले मीच केले, दुराभिमानाचे पेव फुटले....
सर्व त्यांच्या योजनांचा उडविला यांनी बोजवारा....
पाहण्यापूर्वी सर्वनाश हा, बरे त्यांचे डोळे मिटले.....
विस्मृतीत टाकले त्यांना, दाविती हे यांचेच चेहरे,
यांचाच यांनी पिटला डंका, एकूण सारे कान किटले.....
विनवणी आता तुम्हास जन हो, फाडून टाका यांचे बुरखे,
कळू देत जगतास साऱ्या, फुल कुठले अन काटे कुठले
का केलंस असं..
एकदा तरी मागे वळून पाहायचं होतंस.....
निदान मी कसा जळत होतो ते पाहायला....
तुझ्या तिरस्कारातील तो विखार जहाल होता...
क्षणार्धात त्यानं मला पेटवलं...
आभाळ फाटून कोसळणाऱ्या पावसात,
एकही ठिणगी न पाडता...
पण ते जळणं वेदनामय होतं...
तू मला धुमसत ठेवलंस...
भडकण्यात मला सुख मिळालं असतं....
मागे काहीच उरलं नसतं...
पण आता उरलं फक्त आयुष्याचा चिखल....
सर्वांनी तुडविण्यासाठी....
आजूबाजूच्या केर-कचऱ्यात...
पालापाचोळयात....
दगड-मातीत मिसळून जाणारा...
माझं अस्तित्वच नाकारणारा....
तुला बहुधा तेच हवं होतं.....
आयुष्यात फक्त प्रेम हवं म्हणून सांगणाऱ्या तुझ्याकडून,
हे किती अनपेक्षित होतं.....
................राजा जोशी
निदान मी कसा जळत होतो ते पाहायला....
तुझ्या तिरस्कारातील तो विखार जहाल होता...
क्षणार्धात त्यानं मला पेटवलं...
आभाळ फाटून कोसळणाऱ्या पावसात,
एकही ठिणगी न पाडता...
पण ते जळणं वेदनामय होतं...
तू मला धुमसत ठेवलंस...
भडकण्यात मला सुख मिळालं असतं....
मागे काहीच उरलं नसतं...
पण आता उरलं फक्त आयुष्याचा चिखल....
सर्वांनी तुडविण्यासाठी....
आजूबाजूच्या केर-कचऱ्यात...
पालापाचोळयात....
दगड-मातीत मिसळून जाणारा...
माझं अस्तित्वच नाकारणारा....
तुला बहुधा तेच हवं होतं.....
आयुष्यात फक्त प्रेम हवं म्हणून सांगणाऱ्या तुझ्याकडून,
हे किती अनपेक्षित होतं.....
................राजा जोशी
Friday, July 2, 2010
खंत...
आयुष्याच्या वाळवंटात
अश्रूंचा पूर.....
आयुष्य वाहून गेलं तरीही
हृदय मात्र कोरडच...
त्याची तहान वेगळी...
मायेच्या ओलाव्याची....
झेपत नाही त्याला अश्रूंचा लोट..
सगळंच धुवून जातं...
मागे उरत नाही एकही निशाणी...
......खोल खोल घावांची....
आणि ओरखड्यांची.....
मग मागे वळून काय पाहायचं ?
जे आपलं कधीच नव्हतं...
जी नजर परकी होती.....
आभास कि वास्तव....
एव्हढ्या भयानक पुरात वाकुल्या दाखवून हसणारे
ते निःशब्द उसासे.....
काहीच न मिळाल्याने खंतावणारे...
आणि जाळून सुद्धा अस्तित्व दाखवणारे...
उसाच्या सडा सारखे.....
अश्रूंचा पूर.....
आयुष्य वाहून गेलं तरीही
हृदय मात्र कोरडच...
त्याची तहान वेगळी...
मायेच्या ओलाव्याची....
झेपत नाही त्याला अश्रूंचा लोट..
सगळंच धुवून जातं...
मागे उरत नाही एकही निशाणी...
......खोल खोल घावांची....
आणि ओरखड्यांची.....
मग मागे वळून काय पाहायचं ?
जे आपलं कधीच नव्हतं...
जी नजर परकी होती.....
आभास कि वास्तव....
एव्हढ्या भयानक पुरात वाकुल्या दाखवून हसणारे
ते निःशब्द उसासे.....
काहीच न मिळाल्याने खंतावणारे...
आणि जाळून सुद्धा अस्तित्व दाखवणारे...
उसाच्या सडा सारखे.....
Subscribe to:
Posts (Atom)