Thursday, January 9, 2014

गंतव्य.......

आयुष्य सरून गेले, अजुनी उमजले नाही,
आहे खरा कसा मी, अजुनी समजले नाही.......

रात्रीस स्पर्श होता, रवि लाजून लाल होतो,
नाते परस्परांचे, अजुनी समजले नाही.....

प्राशून सागराचे जल होतात मेघ तृप्त,
का ओतती पुन्हा ते, अजुनी समजले नाही.....

वाऱ्यास वाहताना येतो सुरेख गंध,
तो पुष्पास चुम्बताना, कोणीच पाहिले नाही....

धरती न सागराचे नाते असे निराळे,
पण कोरडा किनारा, पाऊल भिजवले नाही.....

ही एक वाट माझी आयुष्य चालण्याची,
जाणार मी कुठे ते अजुनी ठरवले नाही....

No comments:

Post a Comment