Tuesday, March 4, 2014

प्रश्न....

वाट सरळ होती, माझाच रस्ता चुकला होता,
मखमली हिरवळीवर, पायात काटा रुतला होता.........

दोनच थेंब पावसाचे, पण आयुष्य भिजून गेले,
येणारा प्रलय, त्या दोनच थेंबात लपला होता......

मरणाला का दोष देवू, आयुष्यच संपले होते,
जिवंतपणी मरण्याचा खूप अनुभव घेतला होता....

माझे येथे काय होते? रिकामा तर आलो होतो,
आठवणसुद्धा नेण्याला, तू मज्जाव केला होता.......

मला सुद्धा आता काहीच मागे ठेवायचे नाही,
साऱ्यांनाच प्रश्न पडावा, " हा खरंच जगला होता? "

No comments:

Post a Comment