माणसामधलं आज, माणूसपण हरलं आहे,
मंदिर ओस पडलंय, कारागृह भरलं आहे......
चिमणी पिलं चाऱ्यासाठी दारोदार फिरत आहेत,
सडलेल अन्न उकिरड्यावर पसरलं आहे.......
पाप पुण्याची इथे कोणालाच चाड नाही,
देऊळ मात्र नवसाच्या नारळांनी भरलं आहे......
सावित्रीच कपाळ, कुंकवाला महाग होतंय,
वारांगनेच्या गळ्यात, भलं मोठं डोरलं आहे.....
ढगाकडे द्यायला, पाण्याचा थेंब नाही,
मध्यान्हीच्या सूर्याला, काजव्यांनी घेरलं आहे......
माझ्याच हातानी मी, माझी कबर खोदली,
माती लोटायला मात्र, इथ कोण उरलं आहे?
अगदी खरं आहे.......सद्य स्थिती सांगणारे शब्द...!!
ReplyDelete