Thursday, June 23, 2011

खेद.......

सरतात आहे असे दिवस माझे,
कि वाहतो कुणाचे निरर्थक ओझे....
पाहुनी आरसा मला समाधान झाले,
इथे कुणाचेही न पाऊल वाजे..
तोडण्या तो पीत पक्व आम्र,
...केले कुणी दगड काळजाचे माझे....
उरात जखमा अनंत झाल्या,
त्यावरी जाहले कुणी आज राजे....
आक्रंदते ती शांतता भयाने,
बोलावती कोण नाव घेवून माझे?

No comments:

Post a Comment