जगता जगता मरावं कि मरता मरता जगू द्यावं,
झाडाखाली पडलेलं, प्रत्येक फुल मग वेचून घ्यावं.....
आपले कुणी नसले तरी, दुसरे सारे आपलेच असतात,
आपलं पुस्तक मिटून, आपण त्यांचंच पुस्तक वाचून घ्यावं.....
आपलं माणूस शोधण्यामध्ये, सगळं आयुष्य निघून जातं,
आपल्या मनाला बोचणारं सारं, आपल्याच मनाला सांगावं.....
भरून आलेले ढग सुद्धा अश्रू ढाळून हलके होतात,
आपण मात्र डोळ्यातलं पाणी, पापणी मध्येच वाळू द्यावं.....
आठवणींचे ओहाळ अजून चहुबाजूनी वाहतच आहेत,
तुझ्यासाठी वाटतं त्यांना, असंच कायम वाहू द्यावं........
.
apratim kavita
ReplyDelete